उन्हाळ्याला सुरूवात झाली आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कडक उन्हामुळे अनेकांना उष्मघाताच्या समस्या होतात. उष्मघातामुळे अनेक लोकांना खूप त्रास होतो. उन्हाळा सुरू होताच तुम्हाला अनेक प्रकारच्या समस्या होतात. उन्हाळ्यात तुमच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे असते. उन्हाळ्यात वातावरणामधील उष्णतेमुळे होणारा उष्माघात टाळण्यासाठी आरोग्य तज्ञांकडून अनेक उपाय सांगितले आहेत. वातावरणातील उष्णतेमुळे, शक्तपणा जाणवतो किंवा उन्हामुळे शरीर डिहायड्रेट होते आणि कधीकधी असे होते की एखाद्याला रुग्णालयात दाखल करावे लागते. अशा परिस्थितीत, जर तुम्ही घरी या 4 गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुम्ही या सर्व गोष्टी सहजपणे टाळू शकता.
उष्माघातापासून बचाव करण्यासाठी काय करावे
उन्हाळ्यात तुमच्या आहाराकडे विशेष लक्ष देणे गरजेचे असते. आहार तज्ञांच्या नुसार, उन्हाळा सुरू होताच दिवसभरात 4-5 लिटर पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. तुमच्या शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासाठी जास्तीत जास्त फळांचा आहारात समावेश कर. जर एखाद्या व्यक्तीने उष्माघात टाळण्यासाठी घरी काही गोष्टी केल्या तर तो उष्माघातापासून सहज बचावू शकतो. चला जाणून घेऊयात उष्माघातापासून बचाव करण्यासाठी काय करावे?
सूर्यकिरणे थेट डोक्यावर पडली तरच स्ट्रोकचा धोका
उष्मघातापासून बचाव करण्यासाठी सर्वप्रथम, जेव्हा तुम्ही कुठेही बाहेर जाल तेव्हा तुमचे डोके झाकून घ्या. दुपारच्या सूर्यप्रकाशाचे तीव्र सूर्यकिरणे थेट डोक्यावर पडली तरच स्ट्रोकचा धोका खूप जास्त असतो. याशिवाय दुपारी सॅलड आणि डाळी यासारख्या गोष्टी जास्त खा. या ऋतूत पपई आणि टरबूज सर्वात फायदेशीर असतात. तुमच्या आहारात या दोन्ही फळांचा समावेश नक्की करा. दररोज कच्चा कांदा खा आणि 3 ते 4 लिटर पाणी प्या. दर तासाला किमान एक ग्लास पाणी प्यायला विसरू नका. जर शरीर डिहायड्रेटेड राहिले आणि तुम्ही बाहेर गेलात तर उष्माघात होण्याची शक्यता नक्कीच असते.